तांत्रिक बिघाडाचे कारण देत चार दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित; नागरिकांशी अरेरावी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
तांत्रिक बिघाडाचे कारण देत चार दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित; नागरिकांशी अरेरावी
पुणे जिल्ह्यातील थेऊरगाव येथे गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून “तांत्रिक बिघाड” हे कारण पुढे केले जात असले, तरी अद्यापही पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आलेला नाही.
दरम्यान, संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळण्याऐवजी अरेरावीची भाषा वापरल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे.
पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, संबंधित तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करावा तसेच नागरिकांशी गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





